सुशील केडियांच्या ‘मराठी शिकणार नाही’ विधानावरून वाद पेटला: संरक्षणासाठी फडणवीस-शाह यांच्याकडे धाव
गुंतवणूकदार सुशील केडियांच्या ट्विटनंतर मनसे आक्रमक; पोलीस संरक्षणाची मागणी, राजकीय वर्तुळात खळबळ.
मुम्बई प्रतिनिधी
Mumbai, Maharashtra: महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या (Marathi Bhasha) वादाने आता एका नव्या राजकीय संघर्षाचे रूप घेतले आहे. केडियानोमिक्सचे (Kedianomics) संस्थापक सुशील केडिया (Sushil Kedia) या वादात थेट उतरले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर जाहीरपणे म्हटले आहे की ते मराठी शिकणार नाहीत (Won’t learn Marathi), ज्यानंतर पुन्हा राजकारण तापले आहे. राज ठाकरेंना (Raj Thackeray) टॅग करत त्यांनी हे आव्हान दिले असून, आता या सगळ्या घटनेनंतर त्यांनी संरक्षणाची मागणी केली आहे.
ट्विटरवर (Twitter) राज ठाकरेंना टॅग करत केडिया यांनी लिहिले: “मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही. तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी वचन दिले आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे?” मीरा रोड येथील एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Karyakarta) त्याच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही दिवसांनी केडिया यांचे हे विधान आले आहे.
या ट्विटनंतर मनसे कार्यकर्ते (MNS Cadre) चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे नेते मनोज चव्हाण (Manoj Chavan) यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राजकारणात ज्या गोष्टी सुरू आहेत, त्यामध्ये मराठी विषय, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर बोललं की फेमस होतं. भाषेवर कोणी काही बोलत असेल, तर त्यांच्या कानफटात बसणार. महाराष्ट्रात मराठीच चालणार. ज्याला कुणाला मराठी येत नसेल त्यांनी ‘आम्ही मराठी भाषेत शिकून घेऊ’ हे बोलावे, ‘मराठी शिकायचेच नाही, काय करायचं असेल ते करून घ्या’ असे नाही. यापुढे कानाखाली जाळच काढला जाईल. सुशील केडिया कोण आहे? ५ तारखेनंतर निश्चितपणे त्याला काय करायचे ते करू. त्यांनी त्याचे ॲक्शन केले, आता आमची रिएक्शन करण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी थेट इशारा दिला.
दरम्यान, सुशील केडिया यांनी आता धमकीचे फोन येत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असून याबाबत अजून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले: “Kindly note @CPMumbaiPolice I am being called from several police stations such as Amboli, Cybercrime Bandra, SB1 etc etc all offering me protection and in that pretext asking my location. This is a dirty operation already on baying for my blood. Kindly protect me @Dev_Fadnavis @AmitShah.” (कृपया @CPMumbaiPolice लक्षात घ्या, मला अनेक पोलीस ठाण्यांमधून, जसे की आंबोली, सायबरक्राईम बांद्रा, एसबी१ इत्यादी ठिकाणांहून फोन येत आहेत, ते सर्व मला संरक्षण देत आहेत आणि त्या बहाण्याने माझे लोकेशन विचारत आहेत. ही माझ्या रक्ताची भूक भागवण्यासाठी आधीच सुरू असलेली एक घाणेरडी मोहीम आहे. कृपया माझे संरक्षण करा @देव_फडणवीस @अमित_शाह.)
या घटनेवर अनेक तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) म्हणाले, “महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावेच लागेल. जर तुम्हाला मराठी येत नसेल, तर तुमचा दृष्टिकोन असा नसावा की तुम्ही मराठी बोलणार नाही. जर महाराष्ट्रात कोणी मराठीचा अपमान केला तर आम्ही आमचे कायदे लागू करू.” कदम यांनी हिंसाचाराचा निषेध केला आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करायला हवी होती असे म्हटले.
#SushilKedia #MarathiLanguageRow #MaharashtraPolitics #RajThackeray #MNS #DevendraFadnavis #AmitShah #PoliceProtection #MumbaiNews #LanguagePolitics #ViralTweet #IndiaNews #Controversy #Kedianomics















