पंतप्रधान पीक विमा योजना: खरीप २०२५ साठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
बातमीदार- संदेश कदम,आबलोली
गुहागर (प्रतिनिधी): नैसर्गिक आपत्ती, कीटक किंवा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम २०२५ साठी सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. गुहागरचे तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर आणि उपविभागीय कृषी अधिकारी शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या योजनेत भात (धान) आणि नाचणी या पिकांचा समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलै, २०२५ पर्यंत या योजनेत सहभागी होऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
अर्ज कुठे कराल?
- बिगर कर्जदार शेतकरी आपले अर्ज आपले सरकार सेवा केंद्र, बँका किंवा सार्वजनिक सुविधा केंद्रांमध्ये (CSC) वैयक्तिकरित्या सादर करू शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
- तालुका कृषी कार्यालय
- मंडळ कृषी अधिकारी
- गावपातळीवरील सहायक कृषी अधिकारी
- विमा कंपनीचे प्रतिनिधी
शेतीचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने, पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गुहागर कृषी विभागाने केले आहे.















