BSNL टॉवर आहेत पण रेंज नाही; तक्रारी पुन्हा नकोत” – नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 बातमी : “BSNL टॉवर आहेत पण रेंज नाही; तक्रारी पुन्हा नकोत” – नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

 

📌 सिंधुदुर्गातील BSNL नेटवर्क समस्या गंभीर; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश

 

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बी.एस.एन.एल. नेटवर्कबाबत वाढत्या नागरिकांच्या तक्रारींवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “बी.एस.एन.एल.चे टॉवर जिल्हाभरात उभारलेले आहेत पण ग्राहकांना नेटवर्क मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिथे टॉवर्स असूनही नेटवर्क मिळत नाही, तिथे तातडीने उपाययोजना करा.”

Nitesh Rane

ते पुढे म्हणाले की, “नेटवर्कसंदर्भात पुन्हा तक्रारी येता कामा नयेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांना फक्त टॉवर नाही तर दर्जेदार सेवा मिळणं गरजेचं आहे.”

 

या बैठकीस जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, मनीष दळवी, बीएसएनएलचे जिल्हा प्रबंधक रविकिरण जाणू, सागर जोहरले, अतुल पाठने, श्रीमती मुबिन मुल्ला, विलास गोवेकर, कमलेश, सुधाकर हिरामणी, समृद्धी कामत यांच्यासह बीएसएनएलचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीमुळे बीएसएनएल ग्राहकांना दर्जेदार नेटवर्क सेवा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या माध्यमातून बीएसएनएलच्या कामगिरीवर थेट लक्ष ठेवले जात असल्याने भविष्यात सुधारणा अपेक्षित आहे.

 

 

 

#BSNL #NetworkIssue #Sindhudurg #BSNLMeeting #बीएसएनएल_नेटवर्क #सिंधुदुर्ग_तक्रारी #NiteshRane #DigitalIndia #TelecomService #BSNLUpgrade #सिंधुदुर्ग_विकास #जिल्हाधिकारी_बैठक #NetworkImprovement

 

 

 

📸 फोटो

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...