ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही!” – गुहागरमध्ये भास्कर जाधवांचा आक्रमक पवित्रा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🔥 “ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री, मला परिणामांची चिंता नाही!” – गुहागरमध्ये भास्कर जाधवांचा आक्रमक पवित्रा

ब्राह्मण सहाय्यक संघ, भाजप नेते आणि कुणबी समाजालाही दिला इशारा; “माझी कारकीर्द संपली तरी चालेल”

गुहागर – ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमधील ब्राह्मण सहाय्यक संघाविरोधात सोमवारी मुंबईत आयोजित मेळाव्यात जोरदार हल्ला चढवला.

“ब्राह्मण म्हणजे पाताळयंत्री असतात. परिणामांची मला चिंता नाही. लढाई कितीही मोठी झाली तरी माझी कारकीर्द संपली तरी चालेल,” असे स्पष्ट शब्दांत जाधव म्हणाले.

त्यांनी ब्राह्मण सहाय्यक संघाचे तालुका अध्यक्ष घनशाम जोशी यांना ‘बेडकाची’ उपमा देत, “पक्ष म्हणून पत्र लिहिले असते तर चालले असते, पण समाजाच्या नावाने पत्र लिहिले याचे वाईट वाटले. अशा पत्रांना मी गटारात फेकून देतो,” असे कठोर शब्द वापरले.

जाधवांनी निवडणुकीत आपल्या विरोधात बौद्ध समाजाला भडकवल्याचा, घरावर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा आणि संरक्षण काढून घेण्याचा आरोप करत, “वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोन येत होते की मला अटक करा” असा गंभीर दावा केला.

 

यावेळी त्यांनी कुणबी समाजालाही इशारा देत, “मी बाजूला झालो की तुम्हाला गिळून टाकलं म्हणून समजा. उद्या तुमच्या घरात पूजा सांगायला कोणी आले नाही तर मीच येईन,” असे टोले लगावले.

 

“मी वाघाची अवलाद आहे, सहजासहजी गुडघे टेकणार नाही. महाराष्ट्रात विकासकामांसाठी पैशांची कमतरता पडू देणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

📸 फोटो

 

#️⃣ हॅशटॅग्स:

#BhaskarJadhav #GuhagarNews #BrahmanSahayakSangh #PoliticalControversy #MaharashtraPolitics #KunbiSamaj #RatnagiriNews

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...