🟪🟪
ठाकरे बंधू एकत्र येणं शरद पवारांना मान्य आहे का? अन् काँग्रेसचं काय? संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य
मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे-मनसे युतीच्या चर्चांना वेग, शरद पवार हरकत घेणार नाहीत, काँग्रेसलाही माहित – संजय राऊत
मुंबई– आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे बंधूंच्या गाठीभेटीही वाढल्या आहेत. गत आठवड्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाटाघाटीसाठी ठाकरे बंधूंची भेट झाल्याचे कळते. शिवसेना-मनसेची युती झाल्यास आघाडीतील घटक पक्षांची काय भूमिका असणार? याकडे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे.
विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक असतील का? अशी चर्चा आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांना राज-उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काहीही अडचण नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये शंभर टक्के शिवसेनेचीच ताकद आहे. भाजपकडे एक विशिष्ट वर्ग आहे. तसेच त्यांच्याकडे पैसा आणि सत्ता आहे. तरीही मुंबईवर पगडा मराठी माणसांचा राहील. तो त्यांना नष्ट करायचा आहे. त्यांनी सातत्याने तसे प्रयत्न सुरु केले आहेत. तो आम्हाला हाणून पाडायचा आहे. हे काम फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यावरच आपल्याला करता येईल. हे काँग्रेसलाही माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मला असं वाटतं की शरद पवार यांचा विषय तसा अडचणीचा नाहीय. त्यांना महाराष्ट्राच्या भावना माहिती आहेत. काँग्रेसचं दिल्लीतलं जे हायकमांड आहे, काँग्रेसचे अध्यक्ष असतील, खासदार राहुल गांधी असतील किंवा इतर नेते असतील, मुंबई महाराष्ट्रात काय चालू आहे याची महाराष्ट्रातील काँग्रेसचं नेतृत्व देत असेल. विषय फक्त मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आहोत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. आतापर्यंत मनसेने स्वतंत्र निवडणुका लढलेल्या आहेत. त्यांनी कुणाबरोबर युती केली असं दिसलेली नाही. त्यांची प्रथमच शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज-उद्धव एकत्र आल्यास काँग्रेसची काय भूमिका असेल, याविषयी विचारले असता, दिल्लीतील हाय कमांडला मुंबई महाराष्ट्रात काय चाललंय, हे इथले काँग्रेस नेते माहिती देतील. शेवटी मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व जिवंत ठेवायचे असेल तर राज-उद्धव एकत्र यायला हवेत, हे काँग्रेसला देखील माहिती आहे. त्यासंबंधीचा योग्य अहवाल काँग्रेस नेते हायकमांडला देतील, असे राऊत म्हणाले
काँग्रेसच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील नेते दिल्ली हाय कमांडला याबाबत योग्य माहिती देतील. *“शेवटी मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर राज-उद्धव ठाकरे एकत्र यायलाच हवेत,”* असे राऊत यांनी ठामपणे नमूद केले.
***
### Hashtag Mix
#ठाकरेबंधू #संजयराऊत #शरदपवार #उद्धवठाकरे #राजठाकरे #शिवसेना #मनसे #मुंबईमहापालिका #महाविकासआघाडी #Congress #MaharashtraPolitics #मराठिमाणूस















