तर राजकारण सोडेन” — प्रशांत किशोर यांचं मोठं भाकित; बिहार निवडणुकीत उलथापालथ होणार?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥 “तर राजकारण सोडेन” — प्रशांत किशोर यांचं मोठं भाकित; बिहार निवडणुकीत उलथापालथ होणार? 💥

बिहार निवडणुकीत तिरंगी लढत; नितीश कुमार यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह?

बिहार _बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान चढले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने मैदानात उतरून नवा राजकीय समीकरण निर्माण केले आहे. तब्बल पंधरा वर्षांनंतर राज्यात ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून, निकाल १४ नोव्हेंबरला लागणार आहे. यंदा नितीश कुमार यांची ही अखेरची निवडणूक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी जोरदार दावा केला आहे की, जन सुराज पक्ष बिहार निवडणुकीच्या निकालावर मोठा प्रभाव टाकणार आहे. “नितीश कुमार यांना या वेळेस २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. तसे झाल्यास मी राजकारण सोडून देईन,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. याच वक्तव्यामुळे बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

किशोर म्हणाले, “गेल्या ३५ वर्षांपासून बिहारमध्ये काही मोजक्या नेत्यांनी सत्ता उपभोगली आहे. मात्र आता जनता बदलाची मागणी करत आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार, स्थलांतर आणि विकासाचा अभाव — या सगळ्यामुळे मतदार नाराज आहेत.”

महाआघाडीतील नेत्यांनी जन सुराज पक्षावर “भाजपाची बी टीम” असल्याचा आरोप केला असला, तरी किशोर यांनी तो फेटाळून लावत म्हटलं, “आमच्यावर आरोप करणारे पक्ष घाबरले आहेत. आम्ही जातीयवादापलीकडे जाऊन प्रत्येक समाजातील उमेदवारांना संधी देणार आहोत.”

याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीवरही टीका केली. “राहुल गांधींचा बिहारमध्ये फारसा प्रभाव नाही. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला मर्यादित यश मिळेल, पण काँग्रेसचा सुपडासाफ होण्याची शक्यता आहे,” असा दावा त्यांनी केला.

बिहार निवडणुकीत जन सुराज पक्ष २४३ जागांवर उमेदवार उभे करणार असून, किशोर यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही कोणत्याही आघाडीसोबत, निवडणुकीपूर्वी किंवा नंतर, युती करणार नाही.”

आता पाहायचं म्हणजे, प्रशांत किशोर यांचं हे “भाकित” खरं ठरतं की त्यांना खरंच राजकारण सोडावं लागतं — हे १४ नोव्हेंबरला स्पष्ट होईल!

 

 

Credit ~ बातमी साभार सोशल मिडिया व्हायरल 


🔖 हॅशटॅग्स:

#PrashantKishor #BiharElection2025 #NitishKumar #JanSurajParty #Mahagathbandhan #BJP #Congress #TejashwiYadav #IndianPolitics #RatnagiriVartahar

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका