१४.रोजी मुंबईत विराट मोर्चाला बौद्ध, आंबेडकरी जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे – रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश महासचिव विवेक पवार यांचे आवाहन
आबलोली (संदेश कदम)
महाबोधी, महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. या आग्रही मागणीसाठी महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, सर्व आंबेडकरी संघटना, सर्वपक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असून 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 :00 वाजता भायखळा राणीबाग ते आझाद मैदान अशी मुंबईत शांततापूर्ण विराट मोर्चा रॅली आयोजित करण्यात आलेली असून या रॅलीत बौद्ध, आंबेडकरी जनतेने मोठ्या ताकतीने, लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे.असे जाहीर आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे मुंबई महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार यांनी बौद्ध, आंबेडकरी जनतेस केले आहे
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचे मुंबई महासचिव आयु. विवेक गोविंदराव पवार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पुढे म्हणाले की , बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांचे जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी, महाविहार आजही बौद्धांच्या पूर्ण ताब्यात नाही. ज्या कर्मकांड, पिंड दानाला, अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते प्रकार महाबोधी, महाविहार परिसरात होत असल्याने जगभरातल्या बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत. प्रत्येक धर्माचे धार्मिक स्थळ त्या – त्या माझ्यात ट्रस्टकडे असतात. मग बौद्धांचे महाबोधी, महाविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? त्यांच्या बुद्ध विहार ट्रस्ट मध्ये बौद्ध ट्रस्टी का नको? महाबोधी, महाविहार बौद्धांचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे. या आग्रही मागणीसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून बौद्ध,आंबेडकरी जनतेने वेळेत लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे मुंबई प्रदेश महासचिव आयु.विवेक गोविंदराव पवार यांनी केले आहे.















