खासदार नारायण राणे यांचा रत्नागिरी आणि संगमेश्वरमध्ये ‘जनता दरबार’
जनतेच्या समस्या निवारणासाठी विशेष प्रयत्नांचे आश्वासन; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी – द्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी विशेष ‘जनता दरबार’ आयोजित करत आहेत.
या जनता दरबाराचे आयोजन दोन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे:
१. देवरुख, संगमेश्वर येथे:
- तारीख: २८ ऑक्टोबर २०२५
- वेळ: दुपारी १२:०० वाजता
- ठिकाण: मराठा हॉल, भाजपा तालुका कार्यालयाजवळ, देवरुख, संगमेश्वर.
- कोणासाठी:देवरुख – संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी या जनता दरबारात सहभागी व्हावे.
२. रत्नागिरी येथे:
- तारीख: २९ ऑक्टोबर २०२५
- वेळ: सकाळी ११:०० वाजता
- ठिकाण: डी.पी.डी.सी. सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.
- कोणासाठी: रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे.
खासदार नारायण राणे या जनता दरबाराच्या माध्यमातून विविध नागरी समस्या, जनतेची मते, अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना यांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.
सहभागाचे आवाहन:
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपले प्रश्न घेऊन या जनता दरबारात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
खासदार नारायण राणे यांनी यावेळी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, देवरुख आणि राजापूर हे विभाग रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतात.
#समस्यानिवारण #कोकण #BJP #नारायण राणे #जनता अदालत #जनता दरबार
















