शिवसेनेचे पहिले रत्नागिरी जिल्हाप्रमुख, राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव तथा आप्पा साळवी यांचें निधन…
रत्नागिरी : (वार्ताहर) शिवसेनेचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते, शिवसेनेचे पहिले रत्नागिरी जिल्हाप्रमुख, राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव तथा आप्पा साळवी यांचे सोमवारी रात्री वयाच्या ९४ व्यां वर्षी निधन.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीत आणि ग्रामीण भागात शिवसेना नेण्यात आप्पा साळवी यांचे योगदान महत्त्वाचे होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे, निष्ठावान कार्यकर्ते आणि कडवट शिवसैनिक म्हणून आप्पा साळवी यांना ओळखले जातअसे. सेना- भाजप सरकारच्या काळात त्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या कार्यप्रणालीमुळे १९९० च्या सुमारास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. १९९५ मध्ये आमदार म्हणून पहिल्यांदा ते विधानसभेवर निवडून गेले होते.सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, तीन मुली व जावई, असा परिवार आहे.
त्यांचें निधनाचे वृत्त जिल्हात समजताच अनेक शिवसैनिक आणि कार्यकरते यांना दुःख झाले.
माजी खासदार विनायक राऊत, आ. राजन साळवी माजी आ.गणपत कदम मंत्री उदय जी सामंत यांनी ही त्यांचे प्रती शोक व्यक्त केला आहे.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️