रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा

वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता

रत्नागिरी:- श्री निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत “आमचा गाव – आमचा विकास आराखडा 2026/27 तयार करण्यासाठी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा दि 30/12/25 ला पुन्हा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेत लोकशाही व्यवस्थेची अक्षरशः खिल्ली उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४ हजार लोकसंख्या असलेल्या गावात अवघे फक्त ६ ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष मनजे सरपंच, उपसरपंच तसेच एकही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित नव्हते.

पूर्वीच इशारा देऊनही प्रशासन ढिम्म या प्रकाराची गंभीरता ह्यापूर्वी ओळखून तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते निलेश रहाटे यांनी यापूर्वीच ग्रामसभेला
शासकीय व निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, महावितरण अधिकारी, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील
यांना अधिकृत ग्रामसभा नोटीस देऊन ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा व आवर्जून त्याना उपस्थिती राहण्यासाठी सांगावे असे पत्र सुद्धा सरपंच हयांना देण्यात आले होते.
मात्र तरीही संबंधित अधिकारी व कर्मचारी ग्रामसभेला हजर न राहिल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार ग्रामसभेला उपस्थित राहणे हे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच संबंधित अधिकारी चे कर्तव्य आहे.
तहकूब ग्रामसभेलाही जाणीवपूर्वक गैरहजर राहणे म्हणजे कर्तव्यातील गंभीर कसूर असून त्यावर कारवाईची तरतूद कायद्यात आहे.

गावाच्या विकासाचा आराखडा ठरवणारी ग्रामसभा जर लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांनाच महत्त्वाची वाटत नसेल तर — “आमचा गाव – आमचा विकास” आराखडा फक्त कागदोपत्रीच राहणार का?

या संपूर्ण प्रकाराबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दोषी लोकप्रतिनिधी अनुपस्थित मूळे शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
गावात तीव्र नाराजी, संताप व अविश्वासाचे वातावरण पसरले आहे.

“ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. पण इथे लोकप्रतिनिधी लोकसेवक च गैरहजर असतील तर विकास कसा होणार?” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेचा अजिठा ही पूर्ण गावात फिरत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. तक्रारी नंतर प्रशासन कारवाई करणार की वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीतील हा लोकशाहीचा अपमान दुर्लक्षित करणार?
संपूर्ण गावाचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज
Play sound