रत्नागिरी तालुक्यात लोकशाहीचा बोजवारा
वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत तहकूब ग्रामसभेलाही लोकप्रतिनिधी, लोकसेवक बेपत्ता
रत्नागिरी:- श्री निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीत “आमचा गाव – आमचा विकास आराखडा 2026/27 तयार करण्यासाठी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा दि 30/12/25 ला पुन्हा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेत लोकशाही व्यवस्थेची अक्षरशः खिल्ली उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
४ हजार लोकसंख्या असलेल्या गावात अवघे फक्त ६ ग्रामस्थ उपस्थित होते. विशेष मनजे सरपंच, उपसरपंच तसेच एकही ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित नव्हते.
पूर्वीच इशारा देऊनही प्रशासन ढिम्म या प्रकाराची गंभीरता ह्यापूर्वी ओळखून तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते निलेश रहाटे यांनी यापूर्वीच ग्रामसभेला
शासकीय व निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, महावितरण अधिकारी, गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील
यांना अधिकृत ग्रामसभा नोटीस देऊन ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी लेखी अर्ज सादर करावा व आवर्जून त्याना उपस्थिती राहण्यासाठी सांगावे असे पत्र सुद्धा सरपंच हयांना देण्यात आले होते.
मात्र तरीही संबंधित अधिकारी व कर्मचारी ग्रामसभेला हजर न राहिल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार ग्रामसभेला उपस्थित राहणे हे सरपंच,उपसरपंच, सदस्य तसेच संबंधित अधिकारी चे कर्तव्य आहे.
तहकूब ग्रामसभेलाही जाणीवपूर्वक गैरहजर राहणे म्हणजे कर्तव्यातील गंभीर कसूर असून त्यावर कारवाईची तरतूद कायद्यात आहे.
गावाच्या विकासाचा आराखडा ठरवणारी ग्रामसभा जर लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांनाच महत्त्वाची वाटत नसेल तर — “आमचा गाव – आमचा विकास” आराखडा फक्त कागदोपत्रीच राहणार का?
या संपूर्ण प्रकाराबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात येणार आहे. दोषी लोकप्रतिनिधी अनुपस्थित मूळे शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
गावात तीव्र नाराजी, संताप व अविश्वासाचे वातावरण पसरले आहे.
“ग्रामसभा म्हणजे लोकशाहीचा पाया आहे. पण इथे लोकप्रतिनिधी लोकसेवक च गैरहजर असतील तर विकास कसा होणार?” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली व ग्रामसभेचा अजिठा ही पूर्ण गावात फिरत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. तक्रारी नंतर प्रशासन कारवाई करणार की वाटद–मिरवणे ग्रामपंचायतीतील हा लोकशाहीचा अपमान दुर्लक्षित करणार?
संपूर्ण गावाचे लक्ष आता या प्रकरणाकडे लागले आहे.














