रत्नागिरी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी; अजय बिरवटकर गटनेतेपदी निवड
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने खेड तालुक्यातील भडगाव गटाचे नवनिर्वाचित सदस्य अजय बिरवटकर यांची गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने खेड, दापोली आणि चिपळूण तालुक्यांत स्वतंत्र लढत देत एकूण ५ जागांवर विजय मिळवला आहे.
या निवडीमुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका अधिक बळकट होणार असून आगामी सत्तासमीकरणात पक्ष निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील स्थानिक राजकारणात या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
#NCP #AjitPawar #Ratnagiri #ZillaParishad #KonkanPolitics #LocalElections
















