अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

मुंबई विभागात सर्वाधिक नोंदणी; पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक

मुंबई : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. यंदा राज्यभरातील ९ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तब्बल २१ लाख ९८ हजार ६६६ जागा उपलब्ध असून, पहिल्या नियमित फेरीसाठी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-२ भरला आहे. त्यामुळे पहिल्या यादीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, नियमित फेरीसाठी एकूण १७ लाख ४२ हजार ४२३ जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी झालेल्या शून्य फेरीत कोटा प्रवेशातून ३९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे सध्या २१ लाख ५९ हजार ५३ जागा रिक्त आहेत.

अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून १२ लाख ४९ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ९ लाख ४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-२ भरून पहिल्या नियमित फेरीत सहभाग नोंदवला आहे.

२९ मे ते ३ जूनदरम्यान प्रवेश प्रक्रिया

नियमित फेरी-१ ची प्रवेश प्रक्रिया २९ मे ते ३ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास त्या ठिकाणी प्रवेश घेणे बंधनकारक असेल. जर विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला, तर पुढील एका फेरीसाठी त्याला प्रतिबंधित करण्यात येणार आहे.

मुंबई विभागात सर्वाधिक अर्ज

यंदाही मुंबई विभागात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. मुंबई विभागातून २ लाख ६९ हजार ५४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी २ लाख १६ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

तर पुणे विभागात २ लाख ७ हजार ७९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील १ लाख ६८ हजार १३४ विद्यार्थी पहिल्या फेरीत सहभागी झाले आहेत. नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर विभागातही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. लातूर विभागातून सर्वात कमी, म्हणजे ६४ हजार ५५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अल्पसंख्याक आणि इनहाउस कोट्यालाही मोठा प्रतिसाद

अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि इनहाउस कोट्यांतर्गतही मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले आहेत. अल्पसंख्याक कोट्यात ४२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी केवळ मुंबई विभागातच १७ हजारांपेक्षा जास्त अर्ज आहेत. तर इनहाउस कोट्यासाठी ४२ हजार ६३५ अर्ज भरले गेले आहेत.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी गुण आणि मागील वर्षांच्या कटऑफचा विचार करून पसंतीक्रम भरल्यास पहिल्याच यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.





 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना