महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिलांच्या कला, सृजनशीलता आणि विविध कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
मुंबईतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित महिला कला महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, राजश्री कुलकर्णी, नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर तसेच विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात येथे सुमारे एक हजाराहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हे प्रांगण कलाकारांसाठी कला आविष्काराचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरले आहे. अनेक कलाकारांना येथे आपली कला सादर करण्याची संधी मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री ॲड. शेलार यांनी नमूद केले की, महिला दिन केवळ शुभेच्छांचा औपचारिक दिवस नाही. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याची आणि त्यांना प्रोत्साहन देण्याची ही महत्त्वपूर्ण संधी आहे. कुटुंब, समाज आणि परिसरात महिलांची प्रतिभा ओळखून त्यांना पुढे येण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महिलांचे हक्क, समानता आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या संकल्पनेचा उल्लेख करताना मंत्री ॲड. शेलार यांनी समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची गरज व्यक्त केली.
महिलांच्या तक्रारींची संख्या वाढत असताना त्यांच्या समस्यांवर केवळ कायदेशीर मार्ग पुरेसा ठरत नाही. महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाची भावना निर्माण होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमांमधून महिलांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा समाजासमोर मांडल्या जात आहेत. या माध्यमातून महिलांमध्ये सजगता आणि आत्मविश्वास वाढेल, असा विश्वास नंदिनी आवडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी प्रास्ताविक करताना महिला कला महोत्सव २०२६ ची रूपरेषा मांडली. ८ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप

येथे दिलेल्या माहितीवर आधारित एक सविस्तर आणि 'SEO' (Search Engine Optimization) पूरक बातमी खालीलप्रमाणे आहे: मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८...
Read More
मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन मुंबई (गुरुदत्त...
Read More
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणे ही काळाची गरज – महिला कला महोत्सव उद्घाटनप्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...
Read More
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर; २ लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव नवीमुंबई (मंगेश जाधव) पुणे येथील ऐतिहासिक वास्तू लाल महल येथे छत्रपती...
Read More
शिवसन्मान पुरस्कार २०२६ ने ॲड. दिपक सोनावणे यांचा गौरव

विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश. गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक

विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश. गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक ​आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक...
Read More
विज्ञान रंजन स्पर्धेत आबलोलीच्या वैदेही रेपाळ हिचे यश.  गुहागर तालुक्यात पटकावला पाचवा क्रमांक

आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख संदीप...
Read More
आबलोली येथे पडवे जि.प.गटाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी अहिल्या नगर - नंदकुमार बागडेपाटील  प्रवरानगर येथील जिल्हा परिषद...
Read More
ग्रामीण मातीतून सैनिकी स्वप्नांकडे झेप— प्रवरानगर जिल्हा परिषद शाळेची अभिमानास्पद कामगिरी

महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल: जिष्णू देव वर्मा,देशभरात नव्या नियुक्त्या ही जाहीर

देशाच्या राजकीय वर्तुळातून राज्यपालांच्या नियुक्त्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (५...
Read More
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल: जिष्णू देव वर्मा,देशभरात नव्या नियुक्त्या ही जाहीर

युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Gold-Silver Rate Today: युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव मुंबई/पुणे: पश्चिम आखाती देशांमधील तणावपूर्ण वातावरणामुळे...
Read More
युद्धाच्या भडक्याने सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे ताजे भाव

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम

भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक...
Read More
भारताचा ७ धावांनी ऐतिहासिक विजय; ४९९ धावांचा विक्रम, अंतिम फेरीत न्यूझीलंडशी महासंग्राम