राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

highlits

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

 राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून तरुणींची फसवणूक झाल्याच्या दोन दुर्दैवी घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘त्रिवेणी लोकसंचलित साधन केंद्र राजापूर’चे व्यवस्थापक राजन लाड यांनी ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ या शीर्षकाखाली जनजागृतीसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. 

 

गावागावात विविध व्यवसाय, विक्री, प्रचार, स्क्रॅच कार्ड, भेटवस्तू योजना किंवा इतर कारणांच्या निमित्ताने अनेक अनोळखी व्यक्ती फिरत असतात. त्यापैकी बहुसंख्य जण प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असले तरी काही अपवादात्मक घटना समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या दोन घटनांमध्ये पहिल्या प्रकरणात स्क्रॅच कार्ड आणि भेटवस्तू योजनेच्या निमित्ताने फिरणाऱ्या एका प्रौढ व्यक्तीने एका तरुणीला फूस लावून तिच्यासोबत पलायन केले. तर दुसऱ्या घटनेत आसरा व रोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून घरातील तरुणीला पळवून नेण्यात आले.

 

या घटनांमधील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे संबंधित मुली सज्ञान, म्हणजेच १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या असल्याने त्यांनी स्वतःच्या इच्छेने गेल्याचे सांगितल्यास पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाच्या हातात कायद्याने काहीच राहत नाही. परिणामी कुटुंबीयांना मानसिक त्रास आणि हतबलता याशिवाय काहीच उरत नाही, असे आवाहनात नमूद केले आहे.

 

म्हणूनच समाज म्हणून आपण काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगताना गावात नवीन येणाऱ्या व्यक्तीची माहिती जाणून घेणे, तरुण मुला-मुलींना अनोळखी व्यक्तींच्या आमिषांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन करणे, पालकांनी आपल्या मुलांशी नियमित संवाद ठेवणे, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित ग्रामपंचायत, पोलिस पाटील किंवा पोलिसांना माहिती देणे आणि सोशल मीडियावरील व प्रत्यक्ष भेटीत होणाऱ्या अनोळखी संबंधांबाबत जागरूकता निर्माण करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

“घटना घडल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा घटना घडू नये यासाठी सतर्क राहणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत ही पोस्ट कोणत्याही व्यवसाय किंवा समाजघटकाला दोष देण्यासाठी नसून सामाजिक सुरक्षितता, जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी असल्याचे राजन लाड यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या गावातील व कुटुंबातील तरुण पिढीच्या सुरक्षिततेसाठी ही जनजागृतीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे


बातमीदार -प्रशांत पवार,

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि....
Read More
बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; 'सावध गाव-सुरक्षित गाव' मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन  राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या...
Read More
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पेपरफुटी, शिक्षणातील घोटाळे आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे...
Read More
मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून...
Read More
प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी...
Read More
प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन अनिवार्य; ‘वाहन’...
Read More
गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू पुरुषोत्तमपुरी येथे अतिभारामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज;...
Read More
बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक माहिती न दिल्यास ग्रामपंचायत व पोलीस पाटलांवरही कारवाई; साटवली ग्रामस्थांनी...
Read More
साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

■ स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत ■ *धारतळे कोतापूर फाटा नजीक उत्सव रिसॉर्ट मधील दुर्दैवी घटना*...
Read More
स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न