शिक्षक भरतीसाठी बोगस दाखले ? बोगस दाखले देणारे कोण? कारवाई ची मागणी..
रत्नागिरी : कंत्राटी शिक्षक भरतीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले असताना गुहागर तालुक्यात काही गावांच्या पोलीस पाटलांकडून बाहेरील उमेदवारांना स्थानिक असल्याचे बोगस दाखले दिले जात आहेत. यावरुन स्थानिक संतप्त झाले असून गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला शिक्षक कमी पडत असल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीला स्थानिक डीएड, बीएड व पदवीधर यांना मानधन तत्वावर घेण्यात यावे, असे अधिकार दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक उमेदवारांनी शिक्षण विभागाची ही गरज भरून काढत तब्बल १ वर्षे शाळांमध्ये मानधन तत्वावर काम केले.















