वाटद ग्रामपंचायत चे स्वछते कडे दुर्लक्ष- ग्रामस्थांमध्ये संताप..

…
रत्नागिरी (प्रतिनिधी) :- निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यांतील ग्रुप वाटद मिरवणे ग्रामपंचायत नी मार्च २०२४ ला घंटा गाडी खरेदी केली असून पण आजपर्यँत सेवेत नाही….. व अश्या प्रकारे ग्रामपंचायत परिसरात कचरा पडलेला दिसत असून गाडी खरेदी वर खालील प्रश्न ग्रामस्थ हयांच्या मनात उपस्थित होत आहेत.
शोभेसाठी घेतली की काय …?
गाडी घेण्या मागचा उद्देश काय…?
सेवेत केव्हा येणार…..?
गरज नव्हती तर…….?
गाडी घेण्याआधी कचरा उचलण्याचे नियोजन केले नाही का……?
अश्या प्रकारे जनतेच्या पैसा ची उधळण होताना दिसत आहे… गाडी ची किंमत परत त्यासाठी बांधली ली शेड सहित १० लाख अंदाजे खर्च करून सुद्धा नागरिकाना त्या गाडी चे दर्शन होत नाही. खंडाळा मार्केट मधील हया कचऱ्याच्या वासानी तितील स्थानिक ग्रामस्थ हयाचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपये स्वछते बाबत खर्च करून सुद्धा ग्रामस्थ हयांना त्रास सहन करावा लागत आहे.
पत्रकार निलेश रहाटे :- घंटा गाडी जर लवकरात लवकर ग्रामस्थ हयांच्या सेवेत आली नाही तर ग्रामस्थान मार्फत ग्रामपंचायत वर मोर्चा काडून गावातील पडलेला अश्या प्रकार चा कचरा स्वतः उचलून थेट तो कचरा ग्रामपंचायत च्या समोर टाकला जाईल .
शासन स्वच्छता व आरोग्य साठी निधी ची तरतूद करीत आहे, पण ती लोकांपर्यंत ग्रामपंचायत पोचवण्यासाठी अपयशी ठरत असेल तर असल्या योजना काय कामाच्या? असाही सवाल जनतेतून येतं आहे.
वरील बातमी २२/१०/२०२४ आपल्या पोर्टल प्रसिध्द झाली होती..????
रत्नागिरी वार्ताहर Imact —-+















