परतीच्या पावसाने जैतापूर परिसरात नुकसान.
राजापुर-(दिनेश कुवेस्कर) – राजापूर तालुक्यातील जैतापूर पडवे कोंबे इतर गावांमधून मोठ्या प्रमाणावर काल पाऊस वारा वीज चमकून घरावर सिमेंटचे पत्रे उडून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी सायंकाळी अचानक वीज पाऊस वारा येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले व शेतकऱ्यांनी भात कापणीलाही सुरुवात केली आहे ते भात खराब होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे यावर प्रशासनाने नुकसान झालेल्या भात शेती व घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

Author: Dinesh Kuveskar
दिनेश कुवेस्कर - राजापूर, रत्नागिरी वार्ताहर, डिजिटल मिडिया वार्ताहर.