एक लाखाच्या मताधिक्याने लांजा राजापूर साखरपा विधानसभेतून निवडून येणार — किरण सामंत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपला विजय हा राजापूर मतदार संघातील ऐतिहासिक असा विजय असेल -किरण सामंत 

 

एक लाखाच्या मताधिक्याने लांजा राजापूर साखरपा विधानसभेतून निवडून येणार — किरण सामंत

 

राजापूर

भावनिक राजकारण विरूध्द विकास अशी राजापूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक होती. या मतदार संघातील जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे जनतेनेच ही निवडणूक आपल्या हाती घेतली होती.

 

त्यामुळे मतदारांनी भरभरून मतदान केले असून या मतदार संघातुन आपण एक लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा दावा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केला आहे.*

*जे काही स्वयंम घोषित नेते आणि पक्ष प्रवेश केलेले उ. बा. ठा. कडे शिल्लक पदाधिकारी होते त्यांच्या भागातही आपणच मताधिक्क्य घेतलेले असेल हे शनिवारी मतदान यंत्रे उघडल्यावर दिसून येईल असेही किरण सामंत यांनी नमुद केले.*

बुधवारी मतदान प्रक्रिया संपल्यावर किरण सामंत यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला.

 

यावेळी त्यांनी आपल्या विजयाचे गणित मांडले. या मतदार संघातील जनतेला आता विकास हवा आहे, तो विकास कोण कशा पध्दतीने करू शकतो याचा विश्वासही जनतेला आता पटलेला आहे.

 

त्यामुळे ही निवडणूक ही मतदार संघातील जनतेनेच हाती घेतली होती. त्याची प्रचिती प्रचारासाठी फिरताना येत होतीच पण मतदानाच्या दिवशी मतदारांनी भरभरून मतदान करून परिवर्तन घडविणार असल्याचे दाखवून दिले आहे.

 

मतदार संघातील माझ्या भगिनींनी, युवक युवतींनी भरभरून मतदान केले आहे. या मतदार संघातील सुशिक्षित मतदारांनी पक्ष विरहित या मतदार संघाचे भविष्यातील विकासाचे व्हीजन डोळयासमोर ठेऊन मतदान केले आहे.

 

त्यामुळे आपला विजय हा ऐतिहासिक विजय असेल असा विश्वासही किरण सामंत यांनी व्यक्त केला.

भावनिक राजकारणाला आता मतदारांनीच तिलांजली दिली आहे. आंम्हाला पोकळ आश्वासने नकोत, निष्ठेच्या पोकळ गप्पा नकोत आंम्हाला विकास हवा आहे या भावनेतुन आणि या जिद्दीने मतदान करत मतदारांनी बोगस अशा निष्ठेला हद्दपार करण्याचा निर्णय मनापासून घेतला व मतदानाच्या दिवशी भरभरून मतदान करून तो दाखवून दिला आहे.

 

त्यामुळे आपला विजय हा या मतदार संघातील ऐतिहासिक विजय असेल असेही किरण सामंत यांनी नमुद केले.*

 

लांजा राजापूर साखरपा मतदार संघातील युवक महिला तसेच सुशिक्षित मतदारांनी पक्ष मतदान करून माझ्या पर्डात मतदान टाकले असल्याचे मला विश्वास आहे.या मतदार संघात माझ्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीव ओतुन काम केले आहे.

 

त्या सगळयांचेही आपण मनापासून ऋणी असल्याचे नमुद करताना भविष्यात राजापूर मतदार संघातील जनतेच्या मनातील विकास आणि मतदार संघाचा विकासात्मक असा कायापालट झालेला असेल हा आपला शब्द नव्हे वचन आहे असेही किरण सामंत यांनी नमुद केले.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

Leave a Comment

आणखी वाचा...