गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा येथील ६० मुंबईकर चाकरमानी मतदानापासून वंचित
गाडी संध्याकाळी ६:०० नंतर मतदान केंद्रावर पोहचली चाकरमान्यांची घोर निराशा
आबलोली-प्रतिनीधी
गुहागर – २६४ गुहागर विधानसभा निवडणुक २०२४ या निवडणूकीची सर्वत्र धावपळ चालू असतानाच गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा या गावात मतदान करण्यासाठी ६० चाकरमानी मुंबई येथून खाजगी गाड्या करुन निघाले आपण आपल्या उमेदवाराला मतदान करू आणि आपलाच उमेदवार विजयी होणार या निश्चयाने मुंबई येथून प्रवास सुरु झाला रस्ते खराब अडचणी येत होत्या गावी मतदान केंद्रावर पोहचायला उशीर झाला सांयकाळचे ६:०० वाजून गेले आणि त्यानंतर ६० चाकरमान्यांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या पण मतदान केंद्र बंद झाले आणि चाकरमान्यांची घोर निराशा झाली. चाकरमानी मतदानापासून वंचित राहिले आणि कार्यकर्ते नाराज झाले अशी चर्चा गुहागर तालुक्यात सुरु आहे

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक