उबाठा चे रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी ही पक्ष सोडणार!!!
अखेर उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी चे तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी याचे ही ठरल.
योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. जनतेच्या हितासाठी, त्याच्या विकासासाठी भविष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकारांनशी बोलताना सांगितले.
रत्नागिरी – दरम्यान रत्नागिरी तालुक्यात उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला नेताच राहिला नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप च्या माजी आमदाराना शिवसेनेत आणलं. आणि त्यांना विधानसभे चे तिकीट ही दिले. त्यामुळे शिवसेनेतील निष्ठावंत शिवसैनिक कमालीचा दुखावला गेला माजी जिल्हा उपाध्यक्ष उदय बने याच्या सारख्या कट्टर शिवसैनिकांनी पक्ष सोडला आणि आता सगळेच कट्टर शिवसैनिक शिवसेनेला सोडण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान माजी आमदार राजन साळवी यांनी आपल्याला पराभवाला पक्षाचा एक मोठा नेता कारणीभूत असल्याचे जाहीर केले असल्याने राजन साळवी 12 तारखेला भाजप प्रवेश करतील.
दरम्यान विद्यमान तालुका अध्यक्ष बंड्या साळवी हे आपल्याला साथीदारा सह शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.