बागलादेशी व्यक्तीकडे सापडला जन्मदाखला! सरकारी कागदपत्रे असणारी दुसरी घटना !!
शृंगारतळी(वार्ताहर)
काही दिवसापूर्वी एटीएस मुंबईच्या पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेला रत्नागिरी येथून अटक केली.ही महिला बांगलादेशातील ढाका येथील रहाणारी आहे परंतु गेली 5वर्षांपासून ती रत्नागिरी शहरात रहात आहे.
पोलिसांनी सलमा राहील बोंबल वय वर्षे 30 रा. चिरायू हॉस्पिटल च्या मागे सफा अपारमेंट. व पती राहील
बोंबल वय वर्षे 33 मूळ चे सावर्डे चिपळूण यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बांगलादेशीय महिला ही पहिली गुहागर मधून रत्नागिरीत आल्याची माहिती मिळत असून त्या बांगलादेशी महिलेचा जन्म दाखला चिपळूण मधील एका सरकारी कार्यालयातून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सलमा बोंबल हीच नवरा राहील बोंबल वय वर्ष 33 हा मिरकर वाड्यामध्ये मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचेही पुढे आले आहे.
रत्नागिरी शहरात गेली पाच वर्ष राहत असलेल्या सलमा हिच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व जन्मदाखलाही मिळाल्याने आता सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म दाखले देत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची ही चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले जाते. नुकतीच शिरगाव येथील अशीच खोट्या कागदपत्रांची बाब उघडकीस आली होती.
. एटीएस मुंबईचे उपपोलीस निरीक्षक विनय नरवणे अंमलदार स्वप्निल तळेकर तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत.















