महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा , ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा , ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे .

मोठा उलटफेर ! चक्क दर कमी करण्याचा महावितरणचा वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव

 

पुणे :- महावितरणने पहिल्यांदाच ग्राहकांना दिलासा देत ५० ते ६० रुपयांनी बिल कमी करण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दिला आहे. तर २०० युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी जवळपास समान दर ठेवण्याचा प्रस्ताव असल्याने एकंदरीतच महागाईतही महावितरणने सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषिपंप व घरगुती वापरासाठीही सौरऊर्जेचा वाढता वापर यातून सुमारे २ हजार मेगावॅट वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा खर्च कमी झाला आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर हा निर्णय १ एप्रिलनंतर लागू करण्यात येणार आहे.

वास्तविक महावितरण आणि देशातील सर्वच वितरण कंपन्या थकबाकी मुळे ट्रस्ट आहेत. अशा परिस्थितीत हा प्रस्ताव आश्चर्यकारक आहे.

महावितरणला पुढील पाच वर्षांसाठी दर पुनर्रचनेतील बदलासाठीचा प्रस्ताव आयोगाकडे द्यावा लागतो. त्यानुसार महावितरणने २०२९-३० पर्यंतच्या पाच वर्षांसाठीच्या दर पुनर्रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. यात २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे.

सध्या लघुदाब ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंत वीज वापर असल्यास ८९० रुपये वीजबिल येते. नव्या प्रस्तावात या ग्राहकांना दिलासा देत त्यांचे मासिक वीजबिल ५० ते ६० रुपयांनी कमी होणार आहे. हे बिल आता ८३० रुपयांपर्यंत खाली येणार आहे. तर १०१ ते २०० युनिट वापरणाऱ्या ग्राहकांनाही दिलासा देत केवळ १.५ ते २ टक्के दरवाढ अर्थात केवळ २० रुपयांची किरकोळ दरवाढ सुचविण्यात आली आहे. प्रत्यक्षात हा वीजवापर असणाऱ्या बहुतांश ग्राहकांना वीजबिलात कोणताही फरक नसेल. त्यामुळे महावितरणने अनेक वर्षांत वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदाच सादर केला आहे.

कृषिपंपांसाठीही सौर वीज वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर वीज वाचत आहे. महावितरणमधील सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे २ हजार मेगावॅट वीज सौरऊर्जेतून मिळत असल्याने खर्चावरील मोठा ताण कमी झाला आहे. ही वीज केवळ ३ रुपये प्रतियुनिट या दराने मिळत आहे. सौरऊर्जेचा वापर वाढणार असल्याने भविष्यात महावितरणचा खर्चही कमी होणार आहे. परिणामी आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात दरवाढीऐवजी दर कमी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न