राजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीस विलंब ? – लाभार्थ्यांना प्रतीक्षा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरीस विलंब ? – लाभार्थ्यांना प्रतीक्षा

✍️राजू सागवेकर :- राजापूर

🔹🔸राजापूर तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी मागील सहा महिन्यांपासून अर्ज केले असले तरी अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही. यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

🔹🔸राजापूर तहसील कार्यालयात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून शेकडो अर्ज प्राप्त झाले होते. मात्र, तालुक्याची संजय गांधी निराधार समिती स्थापन न झाल्यामुळे आणि प्रस्तावांवर सह्या कोण करणार याबाबत जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टता नसल्याने अर्ज प्रलंबित राहिले होते.

🔹🔸यासंदर्भात तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागवले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना स्वतः कागदपत्रे तपासून मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत.

🔹🔸 त्यामुळे लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. तहसीलदारांकडून लवकरच अर्ज निकाली काढले जातील आणि पात्र लाभार्थ्यांना तातडीने अनुदान मिळेल , अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...