मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार; निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांच्या पदरी काय पडणार? याबाबत उत्सुकता*

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार; निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांच्या पदरी काय पडणार? याबाबत उत्सुकता*

मुंबई- आशियातील सर्वांत मोठ्या अशा मुंबई महानगरपालिकेचा २०२५-२६चा अर्थसंकल्प आज मंगळवारी सकाळी सादर होणार आहे. शहराच्या मालमत्ता करात गेल्या दहा वर्षांत वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा त्यात वाढ होणार की, मुंबईकरांना दिलासा मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये घट झाली आहे का, याबाबतही उत्सुकता आहे. मुदत ठेवींवरून महापालिकेला बऱ्याच टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.

 

मुंबई महापालिकेने मागील वर्षी २०२४-२५चा अर्थसंकल्प सादर करताना, महसूलवाढीसाठी विविध उपाययोजनांची घोषणा केली होती. मात्र या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. महिला सुरक्षेसाठी अॅप, प्रदूषणकारी गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी भंगारयार्ड अशा काही नवीन घोषणाही केल्या होत्या. मात्र त्यांचीही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. २०२३-२४च्या अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा नव्हत्या. जे प्रकल्प हाती घेण्यात आले होते, त्यासाठी भरीव तरतूद केली होती. मात्र त्यावर्षी कोणतीही करवाढ न करता मुंबईकरांना दिलासा देण्यात आला होता. यंदाच्याही अर्थसंकल्पातही करवाढ नसेल, अशी शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांत मालमत्ता करात वाढ झालेली नाही. दर पाच वर्षांनी मालमत्ता करात १४ टक्के वाढ केली जाते.

 

राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला मालमत्ता करांसह अन्य विविध प्रकारची थकबाकी येणे आहे. त्यासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले आणि किती थकबाकी मिळाली, हे अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. महापालिकेने रस्ते, पूल, पाणीपुरवठा प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्यांसह अन्य कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. या कामासांठी भरीव तरतूद केली जाईल. प्रदूषण नियंत्रण अंमलबजावणीसाठीही विशेष प्रयत्न या अर्थंसंकल्पातून होताना दिसतील. २०२२-२३मध्ये ४५ हजार ९४५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. २०२३-२४मध्ये ५२ हजार ६१९ कोटी रुपये, तर २०२४-२५ मध्ये ५९ हजार ९५४कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर झाला होता. यंदा यामध्ये १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

 

मुंबईत सोसायटी स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने व्हावे आणि महसुलातही वाढ व्हावी, या उद्देशाने मुंबई महापालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या दंडात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापन कायदा २०१६मध्ये नवीन दंडाची तरतूद केली आहे. दोन हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या तसेच दररोज १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, आस्थापना, सरकारी कार्यालये, हॉटेले यांना आपल्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर वैयक्तिक २०० रुपये दंड आकारला जाईल. यापूर्वी हाच दंड अनुक्रमे ५०० रुपये आणि १०० रुपये होता. यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन