दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप – मराठी संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप – मराठी संवर्धनासाठी सरकार कटिबद्ध….

????मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

????भाषा ही संस्कृतीची वाहक, तिचे जतन करणे आवश्यक – संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर

 

नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप राजधानी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तसेच, दिल्लीत मराठीजनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

 

मराठीला अभिजात भाषा म्हणून जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार – एकनाथ शिंदे

 

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी भाषेच्या संवर्धनावर भर देत सांगितले की, “मराठी ही आपल्या अस्मितेची भाषा असून ती टिकवण्यासाठी सरकार ठोस पावले उचलत आहे.” राज्य शासनाने दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्रासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असून, हे केंद्र लवकरच सुरू होणार आहे.

 

त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील ग्रंथालयांना अनुदान वाढवण्यात आले आहे आणि नवोदित लेखकांना अधिक संधी देण्यावर सरकारचा भर आहे. साहित्यिकांनी “जे जे मराठी, ते ते जोपासण्याची भूमिका घ्यावी”, असे आवाहन करत त्यांनी साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

दिल्लीतील मराठीजनांसाठी स्वतंत्र वास्तू – अजित पवार यांची घोषणा

 

मराठी संस्कृतीला साजेशी अशी भव्य वास्तू दिल्लीतील मराठीजनांसाठी उभारण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. “या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे त्यांनी सांगितले.

 

त्यांनी मराठी शिक्षण आणि संवर्धनावर भर देत स्पष्ट केले की, “महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे सक्तीचे करण्यात आले आहे. गरज पडल्यास त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल.” मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी साहित्यसंमेलन अधिक भव्य प्रमाणावर होणार असून, या संमेलनाने मराठी भाषेच्या वृद्धीला नवी दिशा दिली, असे ते म्हणाले.

 

मराठी संस्कृतीचे संरक्षण महत्त्वाचे – संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर

 

संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी भाषेच्या जतन आणि संवर्धनाची गरज अधोरेखित केली. “मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची वाहक आहे. तिचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे,” असे त्या म्हणाल्या. मराठी शाळांच्या सुधारणांसाठी सरकारने विशेष तरतूद करावी, अशी त्यांनी मागणी केली.

संमेलनातील ठराव आणि महत्त्वाचे निर्णय

या साहित्य संमेलनात विविध ठराव मंजूर करण्यात आले, त्यामध्ये –

✔ रिद्धपूर मराठी विद्यापीठाच्या नियमित कामकाजासाठी मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देणे

✔ बृहनमहाराष्ट्रातील (सीमावर्ती राज्यांतील) मराठी संस्थांना आर्थिक पाठबळ देणे

✔ बोलीभाषांच्या संवर्धनासाठी ‘बोलीभाषा विकास अकादमी’ स्थापन करणे

✔ राज्यात ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन करून मराठी साहित्याचा प्रसार करणे

साहित्य संमेलनाचा ऐतिहासिक सोहळा

यंदाच्या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनात साहित्य, काव्य, नाटक, समीक्षा, लोककला आणि नव्या पिढीच्या साहित्यिकांच्या योगदानावर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी मराठी भाषामंत्री उदय सामंत, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे आणि कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठीचा जागर – पुढील संमेलनाची उत्सुकता

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आयोजित केलेले हे पहिलेच साहित्य संमेलन ऐतिहासिक ठरले. पुढील १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक भव्य आणि व्यापक स्वरूपात होणार असल्याने मराठीप्रेमींसाठी ही मोठी उत्सुकतेची बाब ठरणार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें