ओबीसी आरक्षणासह आणि नवीन प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ओबीसी आरक्षणासह आणि नवीन प्रभाग रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता!

नवी दिल्ली :

महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत स्पष्ट केले आहे की, आता २७% ओबीसी आरक्षणासह आणि नवीन प्रभाग रचनेनुसारच सर्व निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह सर्वच निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ मध्ये निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

 

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांमध्ये आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र, ४ ऑगस्ट रोजी न्यायालयाने सर्व याचिका फेटाळत राज्य सरकारच्या २७% आरक्षणाच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

 

या निकालामुळे ओबीसी समाजाचा स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय सहभाग अधिक बळकट होणार असून, नगर पंचायत, नगर परिषद, बृहन्मुंबई महानगरपालिका व अन्य संस्थांमध्ये नव्याने घडामोडी होण्याचे संकेत मिळत आहेत.

 

नवीन प्रभाग रचनेमुळे अनेक ठिकाणी राजकीय गणिते बदलण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणुका लांबणीवर टाकल्या गेल्या होत्या. परंतु आता त्या लवकरच पार पडणार असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या संघर्षाचा आणि परिवर्तनाचा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

 

 

🏷️ #OBCReservation #MaharashtraElections #LocalBodyPolls #SupremeCourtVerdict #PoliticalUpdate #MunicipalCorporation #GramPanchayat #UrbanPolitics #Election2025 #NewWardStructure

 

 

 

📸 फोटो

 

 

 

 

 

 

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...