आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही – भाजपा तालुकाध्यक्ष अभय भाटकर
गुहागर येथील पत्रकार परिषदेत परंपरेचे महत्त्व अधोरेखित; आरोप करणाऱ्यांना इशारा
आबलोली (संदेश कदम) –
“आमचे नेतृत्व शांत आणि संयमी आहे. कुठेतरी आजकट, विचकट बोलणे ही आमची परंपरा नाही,” असा थेट टोला कुणाचेही नाव न घेता भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी लगावला. ते गुहागर येथील निसर्ग हॉटेलमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाटकर पुढे म्हणाले, “आमच्या नेत्यावर गेल्या काही दिवसांत आरोप झाले आहेत. पण हे आरोप करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू आता सरकत आहे. काही दिवसांपूर्वी वेळणेश्वर गटातील स्थित्यंतरामुळे रागातून काहीजण बोलत आहेत. आमच्या अंतर्गत बाबींना आम्ही योग्य पातळीवरच उत्तर देऊ. पण उगाचच आपल्या बुडाला आग लागली म्हणून आमच्या नेत्याबद्दल काहीतरी बोलणे आम्ही सहन करणार नाही.”
यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण तालुकाध्यक्ष उदय घाग, माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, उपाध्यक्ष विनायक सुर्वे, आशिष विचारे, प्रांजली कचरेकर, अपूर्वा बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, श्रीकांत मोरे, विजय मसुरकर, रवी अवेरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
#भाजपा #गुहागर #अभयभाटकर #पत्रकारपरिषद #राजकीयबातमी #रत्नागिरीवार्ताहर
















