कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक विद्यालय,धाऊलवल्ली येथे आदरणीय संस्थापक कै.श्री. आर.के.गोखले यांचा स्मृतिदिन संपन्न
राजापूर – संदीप शेमणकर
कै.सौ.आनंदीबाई कृष्णाजी गोखले माध्यमिक
विद्यालय,धाऊलवल्लीचे संस्थापक व माजी अध्यक्ष कै.श्री.आर.के.गोखले ऊर्फ रामभाऊ काका गोखले यांचा
16 ऑगस्ट या दिवशी स्मृतिदिन दरवर्षी मोठ्या श्रध्देने साजरा केला जातो.यावर्षी ही तो मोठ्या श्रध्देने साजरा करण्यात आला.
प्रथम प्रशालेच्या प्रांगणात असलेल्या संस्थापकांच्या पुतळ्यास त्यांचे सुपुत्र व आजी अध्यक्ष एस.आर. गोखले व नातू निनादजी गोखले तसेच चेअरमन के.पी.गोखले,सचिव रमेशजी पाडेकर,मुख्याध्यापिका श्रीम.हरचकर मॅडम यांच्या हस्ते धुप-दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित कमिटी सदस्य,पालक,ग्रामस्थ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,समस्त विद्यार्थी वर्ग यांनी संस्थापकांचरणी नतमस्तक होऊन सभागृहा मध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांमधील माजी विद्यार्थी श्री.भरतजी आपटे यांनी त्यांच्या प्रशालेतील विद्यार्थी जीवनातील संस्थापकांशी झालेला प्रत्यक्ष संवाद व त्या संवादातून संस्थापकांची शाळा स्थापने पासून ते गावाचा विकास यामध्ये त्यांची किती कळकळीची भावना होती. ही त्यांनी आपल्या स्वानुभवातून व्यक्त केली.
व्यासपिठावर उपस्थित असलेले माजी कमिटी सदस्य व माजी विद्यार्थी कमलेश सुरेश आंबेलकर यांनी ही आपल्या भाषणातून मा.संस्थापक यांच्या अमूल्य कार्याचे कौतुक व्यक्त करून आपण हा वारसा पुढे असाच चालू ठेवला पाहिजे असे आपले मत व्यक्त केले.
त्यानंतर कमिटी सदस्य संजयजी गोरे सर यांनीही संस्थापकांच्या अमूल्य कार्याविषयी व त्यांच्या अद्वितीय बुद्धिमत्ते विषयी सलाम करून अनेक आठवणी व्यक्त केल्या.
अध्यक्ष एस.आर.गोखले यांनी ही आपल्या भाषणातून आपले बालपण व समाज कार्यातून आपल्या वाट्यास आलेले आपले बाबा याविषयी खूपच भावस्पर्शी असे शब्द व्यक्त केले.त्यात ते म्हणाले की,आमचे बाबा कायमच शाळा,गावाचा विकास याच विचारांत मग्न असायचे.त्यांची खूप स्वप्ने होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना नियतीने अजून वेळ द्यायला हवा होता.पण आपण सर्वांनी त्यांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलूयात असे मत व्यक्त केले.
चेअरमन के.पी.गोखले यांनी ही आपले मनोगत व्यक्त करतांना बरोबर आज 38 वर्षांनी पुन्हा तिथी नुसार आपल्या काकांचा स्मृस्तिदिन आल्याचे नमूद करून त्यांच्या कामकाजाची अमूल्य पद्धत व त्यांच्या शारिरीक क्षमतेपेक्षा ही त्यांची बौध्दिक क्षमता किती मोठी होती. याचे कौतुक करून त्यांच्या पश्चातही त्यांच्या कार्याचे त्यांचा ओळखीचे महत्त्व व्यक्त केले.
दरवर्षी या दिवशी महत्वपूर्ण असे व्याख्यान आयोजित केले जाते.तर यावर्षी निनादजी गोखले सर यांचे विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित केले होते.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या शिक्षणापासून ते IT क्षेत्रातील करिअर पर्यंतचे महत्वपूर्ण दाखले देत. व विद्यार्थ्यांशी संवाद साधत अतिशय मनमोकळ्या वातावरणात व सहज सोप्या भाषेत व्याख्यान दिले.
याच दिवशी पालक सभाही आयोजित केली जाते. व पालकांशी प्रत्यक्ष हितगुज केली जाते.पालकांशी विद्यार्थी व त्याचे शिक्षण याविषयी मुख्याध्यापिका समवेत चर्चा करण्यात आली .
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रशालेतील जेष्ठ शिक्षक प्रकाशजी कुंभार सर यांनी सुंदर शब्दात पार पाडले.सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.संजिवनी हळदणकर मॅडम यांनी सदर कार्याक्रमाचे उत्तम नियोजन केले. स्मृतिदिनाचा कार्यक्रम सोहळा प्रसंगी प्रशालेतील समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनीही मोलाचे सहकार्य करून प्रशालेतील हा वार्षिक महत्वपूर्ण व कृतज्ञतेचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.















