पिंपळीतील भीषण अपघातात ५ ठार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💥 पिंपळीतील भीषण अपघातात ५ ठार

🟣 भरधाव थारची रिक्षाला धडक; महिलेला “वाचवा, वाचवा” म्हणून आरडाओरड

चिपळूण :
मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असतानाच अपघातांचे सत्रही सुरूच आहे. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चिपळूणजवळील पिंपळी (केनॉल) येथे भरधाव थार जीप आणि प्रवासी रिक्षाचा झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चौघांचा समावेश असून थार चालकाचाही त्यात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील क्रमांकाची थार गाडी वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की रिक्षा चक्काचूर झाली. रिक्षातील चौघे प्रवासी जागीच ठार झाले, तर थारचा चालकही मृत्यूमुखी पडला.

अपघातानंतर थार गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, थार गाडीत एक महिला असल्याचे आढळले. चालकाने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले होते, असा संशय व्यक्त होत आहे. अपघाताच्या अगोदर ती महिला “वाचवा, वाचवा” अशी आरडाओरड करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे खेर्डी येथे या महिलेला सुखरूप वाचवण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच चिपळूणचे डीवायएसपी बेले, पोलीस निरीक्षक यंत्रणेसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चिपळूण येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले. पुढील तपास सुरू असून थार गाडी नेमकी कशी व कोणत्या उद्देशाने प्रवास करत होती, तसेच अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळी नुराणी मोहल्ला येथील चार नागरिकांचा अकस्मात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.


🔖 हॅशटॅग्स :

#पिंपळीअपघात #चिपळूण #मुंबईगोवा_महामार्ग #Ratnagiri #BreakingNews


📸 फोटो 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...