मुंबई – गणेशोत्सवानिमित्त मुंबईस्थित कोकणवासीयांची कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. ज्या प्रवाशांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळाले नाही, ते प्रवासी एसटीचा मार्ग निवडतात. तसेच मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या अनेक प्रवाशांची पहिली पसंती एसटीला असते. त्यामुळे ४,२०० गट आरक्षणासह एकूण ४,९५३ जादा बस आतापर्यंत पूर्ण भरल्या आहे. अजूनही आर्षणासंदर्भात विचारणा सुरू आहे. संपामुळे हि थोडासा प्रवाशांचा हिरमोड झाला होता पण आता संप मिटला आता आणखी काही बसेस मिळू शकतील अशी ही आशा प्रवाशांना आहे.















