न्यायासाठी विनामूल्य लढाई – ॲड. सुनील पाटील, ॲड. परेश पाटील व ॲड. हर्षल रणधीर मैदानात

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विनामूल्य लढाई – ॲड. सुनील पाटील, ॲड. परेश पाटील व ॲड. हर्षल रणधीर मैदानात

पाचोरा (गुरुदत्त वाकदेकर) :

तालुक्यातील बहुचर्चित शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरण आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. या घोटाळ्यामुळे हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ नाकारला गेला असून, कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक तपासात व पहिल्या टप्प्यात सुमारे १ कोटी २० लाखांच्या जवळपास अपहार झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून, आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पाचोरा न्यायालयात ॲड. सुनील पाटील (मो. ८८८८२६१८८३), जिल्हा सत्र न्यायालय जळगाव येथे ॲड. परेश पाटील (मो. ८६२५०३४४४४) आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ॲड. हर्षल रणधीर (मो. ९७६६३९९८८५) यांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य न्यायालयीन लढाई सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

या प्रकरणात तीनही वकिलांनी घेतलेला निर्णय शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा ठरतो. कारण न्यायालयीन लढाईसाठी मोठा खर्च येतो आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तो परवडणारा नसतो. वकिलांनी नि:शुल्क खटला लढवण्याची भूमिका घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असुरक्षितता दूर झाली आहे. शेतकरी वर्गात या निर्णयाचे स्वागत होत असून, “आता आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे,” अशी एकमुखाने मागणी केली जात आहे.

सामाजिक व जनहिताची जबाबदारी पत्करून सत्यस्थिती बाहेर आणण्यात आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचे योगदान अनन्यसाधारण ठरले आहे. त्यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करून, अन्न-पाणी त्याग करून हा विषय उचलून धरला. शेतकरी वर्गाचा आवाज त्यांनी प्रामाणिकपणे माध्यमांतून पोहोचवला आणि आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले.

शासनाच्या योजनांवरील बनावट कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याने, सर्व स्तरांवरून “आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये” अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या सुनावण्या, विशेषतः अटकपूर्व जामिनावर होणाऱ्या युक्तिवादात, सरकारी वकिलांसोबत या वकिलांची ठाम भूमिका आरोपींच्या भवितव्याचा निर्णय घेणारी ठरेल.

पाचोरा न्यायालयात ॲड. सुनील पाटील, जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. परेश पाटील आणि छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात ॲड. हर्षल रणधीर यांची उपस्थिती शेतकऱ्यांच्या मनाला आत्मविश्वास देणारी आहे. तर आंदोलनकर्ते व पत्रकार संदीप महाजन यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम म्हणूनच हा लढा निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.

शेतकरी बांधवांचे विश्वास भंग झाल्याचे असून, त्यांच्या बाजूने उभे ठाकलेले वकील आणि पत्रकार-आंदोलनकर्त्यांची एकजूट ही लढाईला नवी ताकद देणारी आहे. शेतकरी न्यायासाठी सुरू झालेली ही लढाई आता फक्त पाचोऱ्यापुरती मर्यादित न राहता राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. शेतकरी वर्गाने ठाम निर्धार केला आहे की, न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...