देवरुख कनिष्ठ महाविद्यालय आयोजित निबंध स्पर्धेत रिया कदम प्रथम, तर वैभवी चव्हाण द्वितीय क्रमांकाचे मानकरी.
देवरुख- (वार्ताहर) – देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निबंध स्पर्धेसाठी लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ आणि ‘ लोकमान्य टिळकांची पत्रकारिता’ असे दोन विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ८९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले निबंध सादर केले होते. या स्पर्धेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
प्रथम क्रमांक- कु. रिया सुधीर कदम(१२वी वाणिज्य ).
द्वितीय क्रमांक- कु. वैभवी बबन चव्हाण(१२वी संयुक्त-वाणिज्य).
तृतीय क्रमांक- कु. दुर्वेश प्रकाश गीते(१२वी संयुक्त-वाणिज्य ).
उत्तेजनार्थ- १) कु. पूर्वा जगन्नाथ खाके(११वी वाणिज्य).
२)कु. तनिष्का विलास चव्हाण (१२वी बँकिंग).
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. वसंत तावडे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी केले. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. देवयानी जोशी यांनी मेहनत घेतली.
*फोटो-* प्रथम तीन क्रमांक प्राप्त करणारे यशस्वी विद्यार्थी.
*छाया-* हर्ष घाटकर.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️