आबलोली येथे गुरुवार दि.२६ रोजी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि जि.प. आरोग्य रुग्णालय रत्नागिरी यांचा स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपुत्र आणि तंटामुक्ती अध्यक्ष तसेच बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर (रजि.) या संस्थेचे उपाध्यक्ष विद्याधर राजाराम कदम तथा आप्पा कदम यांच्या रक्तदानाच्या शतकपूर्तीचा वसा कायम पुढे चालवण्यासाठी आणि आप्पा कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रक्तदान शिबिर ३० जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार होते तशी तयारी झाली होती परंतू महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे हे शिबिर पुढे ढकलण्यात आले होते. आप्पा कदम यांनी रक्तदानाचा दिलेला वसा पुढे चालवण्यासाठीच गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्राचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे तसेच रक्तदानाची शतकपूर्ती पूर्णत्वाकडे नेणारे आप्पा कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. तरी गुहागर तालुक्यातील रक्तदात्यांनी रक्तदानासाठी सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके – मो.नं. ९४०४३२६३७७, उपसरपंच अक्षय पागडे – मो.नं.७५८८६९६१६२, प्रमेय आर्यमाने – मो.नं.९४०३१४३१४३, पोलीस पाटील, महेश भाटकर – मो.नं.९४२०७७८९१०, सचिन कारेकर – मो.नं.९४२३१२९७९६, अनिकेत पागडे – मो.नं.९४२१११६०१०, महेंद्र (आप्पा) कदम – मो.नं.९६६५२३६५१९ त्यांच्याशी संपर्क साधावा असे जाहीर आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.














