
काताळे ग्रामपंचायतीच्या वतीने काशिवंडे बीच स्वच्छता अभियानाला ग्रामस्थ व कर्मचारी वर्गांचा उत्स्फूर्त सहभाग..
आबलोली (संदेश कदम)…..
स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या १५ आवड्यामध्ये स्वच्छता ही सेवा या फीड खाली ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये दिनांक २१/०९/ २०२४ रोजी सागरी किनारा स्वच्छता अभियान या माध्यमातून तवसाळ येथील काशिवंडे बीच स्वच्छ करण्याचे नियोजन केले होते या अभियानामध्ये ग्रामपंचायत बरोबरच सर्व कर्मचारी वर्ग विद्यार्थी ,ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला व हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला त्यावेळी निर्मल ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ.प्रियांका निलेश सुर्वे ,सदस्य सौ. नम्रता निवाते तसेच ग्राम विकास अधिकारी श्री.निमकर भाऊसाहेब, कर्मचारी वर्ग अमोल सुर्वे ,दीपक बारस्कर प्रशिक्षणार्थी मंगेश झगडे
सर्व शाळा मुख्याध्यापक बाबरवाडी शाळा प्रमोद साळवी सर , नवानगर शाळा दिलीप गुरसुळे सर , तांबडवाडी शाळा अंकुर मोहिते सर ,तवसाळ शाळा संदीप खंडगावकर सर ,काताळे नं. १ शाळा दिपक चव्हाण सर, नवानगर उर्दू शाळा शाहीन पिंपरी मॅडम तसेच तवसाळ खुर्द अंगणवाडी सेविका छाया सुर्वे मॅडम कातळे नवानगर उर्दू अंगणवाडी सेविका फरीदा मॅडम, पावसाळा तांबडवाडी अंगणवाडी संगीता सुर्वे मॅडम, अंगणवाडी मदतनीस आरती सुर्वे , राजेश्री कुरटे मॅडम त्याचबरोबर आशा सेविका तवसाळ खुर्द रश्मी गडदे ,आशा सेविका तवसाळ भारती सुर्वे अआशा सेविका काताळे अर्चना बारस्कर व बचत गट प्रतिनिधी स्वप्ना शिरधनकर, दीक्षा पवार महिला वर्ग अंकिता जाधव, स्वरा कुळ्ये, पूजा कुरटे , मानसी कुरटे आधी उपस्थित होते. याचबरोबर या पंधरवड्यामध्ये शाळा स्तरावर घोषवाक्य व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका बचत गट प्रतिनिधी यांच्यामार्फत गृहभेटी घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आवाहन सरपंच सौ. प्रियांका सुर्वे मॅडम यांनी केले आहे .

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक