राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
राजापूर : ( वार्ताहर) विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उबाठा शिवसेनेचे उपनेते व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी हे राजकीय पुनर्वसनासाठी एका सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा केवळ राजापूर-लांजा मतदार संघातच नव्हे, तर दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे. याबाबतच्या घडामोडींचा कानोसा घेता नव्या वर्षाच्या प्रारंभी अशी वादळी घडामोड प्रत्यक्षात होऊ शकते, याला पुष्ठी मिळत आहे. त्यातच हा सत्ताधारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षच असेल, अशी अटकळ बांधण्यात आली आहे. मात्र तसे घडल्यास जिल्ह्यातील राजकीय वातावरणात भाजप अधिकच आक्रमक असल्याचे स्पष्ट होणार आहे.
मात्र माजी खासदार विनायक राऊत आणि उबाठा च्या सुषमा अंधारे यांनी एका टीव्ही वाहिनी शी बोलताना सांगितले की सदर ची बातमी खोटी आणि कोणीतरी अफवा पसरवून दिशा भुल करत आहे, आमचं राजन साळवी यांचेशी फोनवर बोलण झालं असून ते असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शी व पक्षासी एकनिष्ठ आहेत आणि पुढे ही राहणार.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.