आबलोलीचे आप्पा कदम “रक्तदान रत्न” तर प्रगतशील शेतकरी सचिनशेठ कारेकर आबलोली भूषण”पुरस्काराने सन्मानित

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचा महारक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली, महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, निस्वार्थी समाज सेवक आणि आपल्या जीवनात रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानून अनेकांना जिवदान देणारे “जिवनदाता “, “आबलोली भूषण” अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अनेकांसाठी देवदूत ठरलेले आबलोली गावाचे नाव, गुहागर तालुक्याचे नाव, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उंच शिखरावर नेणारे आबलोली गावचे सुपूत्र विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांनी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी आप्पा कदम यांच्या रक्तदान शतकपूर्तीसाठी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीरात ६५ व्या वर्षी १०० व्या वेळा रक्तदान करुन रक्तदानाची शतकपूर्ती साजरी केली याची दखल घेऊन निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी आप्पा कदम यांना “रक्तदान रत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले
तसेच गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र, गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले प्रगतशिल शेतकरी सचिनशेठ कमलाकर कारेकर यांनी आबलोली गावचे नाव, गुहागर तालूक्याचे नाव, देशपातळीवर उच्च शिखरावर नेल्याबद्दल निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांनी सचिनशेठ कारेकर यांना “आबलोली भूषण” पुरस्काराने महारक्तदान शिबीरात दुपारच्या सत्रात गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे गौरवण्यात आले सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.वैष्णवी नेटके या होत्या.आबलोलीच्या आप्पा कदम आणि सचिनशेठ कारेकर यांना हे दोन्हीं पुरस्कार पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, सरपंच वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आले यावेळी सत्काराला उत्तर देताना आप्पा कदम यांनी प्रत्येकाने परिश्रम, मेहनत करा. मी १०० वेळा रक्तदान केले आहे. रक्त दिल्याने कुणाला तरी जिवदान मिळते त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकवेळा रक्तदान करा रक्तदान केल्याने नुकसान होत नाही आपल्या शरीरात शुद्ध रक्त तयार होते.असा संदेश आप्पा कदम यांनी दिला तर सचिनशेठ कारेकर हे गावाच्या, घरच्या सत्काराने भाऊक होऊन त्यांनी गावाचे ऋण व्यक्त करुन शेती करा शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करा यश निश्चित मिळते शेती शिवाय तरणोपाय नाही असा संदेश सचिनशेठ कारेकर यांनी दिला.
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगीड, कृषी अधिकारी गजेंद्र पौणिकर, सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी ,उपसरपंच अक्षय पागडे, सत्कार मुर्ती आप्पा कदम, सौ. विभावरी कदम, सचिनशेठ कारेकर, सौ.स्वरुपा कारेकर, माजी सरपंच सौ. श्रावणी पागडे,मंडळ अधिकारी आनंद काजरोळकर,आबलोलीचे ग्राममहसूल अधिकारी विनोद जोशी, आर. पी. आमचे गुहागर तालुका अध्यक्ष संदिप कदम,यशवंत पागडे, पोलिस पाटील महेश भाटकर,माजी सरपंच प्रमेय आर्यमाने, ग्रामपंचायत सदस्यां सौ. वृषाली वैद्य, सौ. शैला पालशेतकर,सौ.रुपाली कदम,सौ.पायल गोणबरे, श्रीमती. नम्रता निमूणकर, शरद साळवी आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील विविध राजकीय पक्षाचे, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच आबलोली गावातील ग्रामस्थ शिक्षक बंधू- भगिनी, अंगणवाडी सेविका,कर्मचारी, गावकरी, वाडीप्रमूख, बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी आप्पा कदम आणि सचिनशेठ कारेकर यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सुर्यवंशी यांनी केले तर सुत्रसंचालन सुहास गायकवाड यांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्मल ग्रामपंचायत आबलोली, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,सर्व ग्रामस्थ तसेच आप्पा कदम मित्र मंडळ आणि सचिनशेठ कारेकर मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.