रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्पासाठी 29 वर्षाचे भाडेकरार करणारी महिलांची जिल्ह्यातील पहिली कंपनी…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्पासाठी 29 वर्षाचे भाडेकरार करणारी महिलांची जिल्ह्यातील पहिली कंपनी..

रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे

रत्नागिरी उमेद अभियान रत्नागिरी अंतर्गत महिलांची स्थापन केलेली रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी ही माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण कृषी परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट ) या योजनेचा लाभ घेत आहे …

 

त्यासाठी 29 वर्षाच्या भाडे करारावर जमिनीची आवश्यकता होती आणि यासाठी कंपनीचे संचालक मंडळ यांनी सतत दोन वर्ष पाठ पुरावा करून कृषी आधारित प्रकल्प उभारण्यासाठी खानू येथील शासकीय जमीन शासनाच्या विविध परवानगी मिळवून नाममात्र भाडे करारावर घेतली आहे. त्याचा नोंदणीकृत भाडेकरारनामा सहा दुय्यम निबंधक,रत्नागिरी यांचेकडे दि.03/03/2025 रोजी तो नोंदविण्यात आला आहे.

 

लवकरच या कंपनीचा काजु प्रक्रिया प्रकल्प स्मार्ट योजनेच्या आर्थिक सहाय्यानं सुरू होणार आहे…

 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उमेद अभियानाच्या एकूण 15 कंपनी स्थापन झालेले असून… रत्ननगरी महिला शेतकरी उत्पादक कंपनी ही पहिली आहे जिने आज रोजी हा जमिनीचा 29 वर्षाचा भाडे करार केलेला आहे…

मौजे- खानू ग्रामपंचायत, तालुका जिल्हा – रत्नागिरी हद्दीतील ही जमीन मिळकत आहे त्या ठिकाणी या प्रकल्पाची उभारणी होणार असून रत्ननगरी कंपनी मध्ये 500 हून अधिक महिला शेतकरी सभासद आहेत. हा प्रकल्प ग्रामीण भागात कृषी क्षेत्रात परिवर्तन घडविणारा ठरेल असा विश्वास शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी मांडला आहे.

 

यासाठी वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय ना.श्री. उदयजी सामंत साहेब, मा.श्री.किर्ती कुमार पुजार सर ,CEO जिल्हा परिषद रत्नागिरी. मा.प्रकल्प संचालक, उमेद अभियान.स्मार्ट प्रकल्पाचे मा.अधिकारी व कर्मचारी. पंचायत समिती रत्नागिरीचे मा.गटविकास अधिकारी, जाधव साहेब. ABDO शेळके साहेब, अधीक्षक खेडेकर साहेब. मा.श्री. अय्याज पिरजादे सर जिल्हा अभियान व्यवस्थापक,उमेद. मा.निलेश धमाले सर, तालुका अभियान व्यवस्थापक, रत्नागिरी. प्रभाग समन्वयक उमेद अभियान कोळेकर सर , सल्लागार – कु. सुमित कुळे सर, कायदे सल्लागार ॲड. प्रतिक मुळ्ये सर. खानू गावचे ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतचे मा.सरपंच , मा.ग्रामसेवक. कंपनीचे सभासद , हातखंबा प्रभागातील सर्व केडर, सर्वांचे कंपनीचे संचलिका सौ. विद्या बोंबले व सर्व संचालकांनी आभार मानले.

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]