विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांनी घ्यावी काळजी

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; नागरिकांनी घ्यावी काळजी

मुंबई, १६ मार्च – राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे, तर अकोला, अमरावती, वर्धा, आणि नागपूरमध्येही ४० अंशांच्या वर तापमान पोहोचले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमान असेच राहण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी सूचना:

➡️ दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नका.
➡️ भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.
➡️ हलका आणि सैलसर कपडा परिधान करा.
➡️ उन्हात जाताना टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
➡️ लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.

दरवर्षी होळीच्या नंतर तापमान वाढण्याची प्रवृत्ती दिसते, मात्र यंदा होळीच्या अगोदरच उन्हाचा जोर जाणवत आहे. विदर्भातील लोकांनी अत्यंत सावध राहून उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें