मत्स्य व्यवसायाला “कृषीचा दर्जा” – कोळी समाजाच्या संघर्षाला मिळाले यश!

मत्स्य व्यवसायाला “कृषीचा दर्जा” – कोळी समाजाच्या संघर्षाला मिळाले यश!

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे कोळी बांधवांकडून आभार

मत्स्य विभाग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार.

मुबई – आजचा दिवस राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी आणि मत्स्य व्यवसाय विभागासाठी एक ऐतिहासिक व निर्णायक वळण घेणारा ठरला आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार, मत्स्य विभाग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मत्स्य व्यवसायाला “कृषीचा दर्जा” देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय म्हणजे कोळी समाजाने अनेक वर्षांपासून चालवलेल्या संघर्षास मिळालेलं मोठं यश आहे. या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायाला अधिक शासकीय मदत, अनुदाने व विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या निर्णयाबद्दल कोळी बांधवांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या ऐतिहासिक घडामोडीमुळे राज्यातील मत्स्य व्यवसायाला चालना मिळेल, अशी अपेक्षा   मां .मंत्री नितेश जी राणे यांनी व्यक्त केली आहे.

हॅशटॅग्स:
#धन्यवाददेवाभाऊ #DhanyavaadDevabhau #DevendraFadnavis #NiteshRane #BlueRevolution #Fisheries #FishFarmers #FisheriesDevelopment #MaharashtraFisheries

फोटो 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें