ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १ व २ मे रोजी कामबंद आंदोलन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे १ व २ मे रोजी कामबंद आंदोलन

 

वेतन व सेवा शर्तींसाठी सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन; अद्याप ठोस निर्णय नाही

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी १ आणि २ मे रोजी कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा होडे यांनी दिली.

 

या आंदोलनामागे विविध प्रलंबित मागण्या आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करणे, निवृत्ती वेतन व ग्रॅज्युएटी लागू करणे, तसेच सुधारित किमान वेतन तत्काळ लागू करण्याची मागणी आहे.

 

शासन निर्णयानुसार वसुली आणि उत्पन्नाची जबाबदारी सरपंच, कार्यकारी मंडळ, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर समान आहे; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडूनच अपेक्षित असल्याचा आरोप कामगार सेनेने केला आहे. वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करावी, अशीही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.

 

या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी मोर्चे, आंदोलन, मेळावे, अधिवेशने आणि मंत्र्यांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

 

हॅशटॅग्स:

#ग्रामपंचायतआंदोलन #कामबंदआंदोलन #संगमेश्वर #रत्नागिरीबातम्या #ग्रामपंचायतकर्मचारी #राज्यशासन #मागण्या

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]