देशभरात हजारो पाकिस्तानी; सरकारला जाग कधी येते?

देशभरात हजारो पाकिस्तानी; सरकारला जाग कधी येते?

पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रातील हजारो लोक देशात कसे स्थायिक झाले? पहलगाम हल्ल्यानंतरच केंद्राला त्यांची आठवण का झाली, असा सवाल ‘सामना’ने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

मुंबई 
देशभरात हजारो पाकिस्तानी नागरिक वैध किंवा बेकायदेशीर मार्गाने राहत असल्याचा गंभीर मुद्दा ‘सामना’ने अग्रलेखातून उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात 5 हजारांहून अधिक, राजस्थानात 30 हजार, दिल्लीत 5 हजार, तर छत्तीसगड व मध्य प्रदेशातही शेकड्यांनी पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातच तब्बल 2,458 पाकिस्तानी असल्याचे समोर आले असून त्यातील 30 जणांचा ठावठिकाणा पोलिसांनाही नाही. ठाण्यात 33 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचे उपमुख्यमंत्री सांगतात, तर मुख्यमंत्री मात्र कोणताही पाकिस्तानी गायब नसल्याचा दावा करतात.

देशात पाकिस्तानी नागरिक इतक्या संख्येने राहू लागले तरीही याकडे दुर्लक्ष का झाले, असा प्रश्न ‘सामना’ने उपस्थित केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतरच ही कारवाई का सुरू झाली, केंद्र सरकारने एवढ्या उशिरा का जाग येते, असा सवाल करत अग्रलेखात सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

हॅशटॅग्स:
#सामना #पाकिस्तानीनागरिक #देशाचीसुरक्षा #पहलगामहल्ला #महाराष्ट्रराजकारण #AmitShah #PakistaniInIndia #घुसखोरी

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें