रत्नागिरीत उद्या शौर्यवंदन तिरंगा रॅली; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरीत उद्या शौर्यवंदन तिरंगा रॅली; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

मारुती मंदिर ते जयस्तंभापर्यंत सकाळी ८ वाजता रॅली; भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला रत्नागिरीकरांचा सलाम

बातमी मजकूर:
रत्नागिरी | उद्या रविवारी (११ मे) सकाळी ८ वाजता रत्नागिरी शहरात शौर्यवंदन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली मारुती मंदिर येथून सुरू होऊन जयस्तंभा पर्यंत निघणार आहे.

वसुधैव कुटुंबकम्” या तत्त्वज्ञानावर चालणाऱ्या भारताने कधीच युद्धाचा पुरस्कार केला नाही, मात्र अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने दाखवलेला शौर्य पराक्रम प्रेरणादायी आहे. पहलगाम येथील हल्ल्याचा प्रतिउत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांचा यशस्वी विध्वंस केला. या पार्श्वभूमीवर देशभरात सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी शौर्यवंदन तिरंगा रॅलीचे आयोजन होत आहे.

“आपल्या तिन्ही सैन्यदलांचा आणि प्रत्येक सैनिकाचा आम्हाला अभिमान आहे. चला सर्व रत्नागिरीकरांनी एकत्र येऊन त्यांचे मनोबल वाढवूया.”
— डॉ. उदय सामंत,
उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

#शौर्यवंदन #तिरंगारॅली #रत्नागिरी #उदयसामंत #भारतीयसैन्य #राष्ट्रप्रेम

फोटो

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें