वादळी वाऱ्यांसह अवकाळीचा इशारा! राज्यावर पुढील ५ दिवस गंभीर सावट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वादळी वाऱ्यांसह अवकाळीचा इशारा! राज्यावर पुढील ५ दिवस गंभीर सावट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर; पिकांचे नुकसान, नागरिक सतर्क राहा

बातमी …
मुंबई: राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम असून हवामान विभागाने पुढील ५ दिवसांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अचानक बदललेल्या वातावरणामुळे पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव नागरिक घेत आहेत. परिणामी उन्हाचा चटका कमी झाला असला, तरी शेतीला मोठा फटका बसत आहे.

विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व नव्याने स्थापन झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. आंबा, केळी, द्राक्षे आणि उन्हाळी भाजीपाला पिकांना याचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

#हॅशटॅग्स:
#AvakaliPaus #WeatherAlert #MaharashtraRain #FarmersAlert #Marathwada #Vidarbha #MadhyaMaharashtra #KonkanWeather #RainUpdate #पाऊसवार्ता

फोटो

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]