राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; महावितरण ‘हाय अलर्ट’वर!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; महावितरण ‘हाय अलर्ट’वर!

लोकेश चंद्र यांचे निर्देश – अधिकारी मुख्यालय न सोडता २४ तास कार्यरत राहणार, तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य

बातमी..
पुणे : अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणने सावध भूमिका घेत राज्यभर ‘हाय अलर्ट’ जारी केला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले. सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले असून, खबरदारी म्हणून आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वीज यंत्रणांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता खांब, ट्रान्सफॉर्मर, तारा आणि इतर दुरुस्ती साहित्य तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले की, कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. दुरुस्तीच्या कामात टाळाटाळ झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच, ग्राहकांना वीज खंडित होण्याची पूर्वसूचना लघुसंदेश, सोशल मीडियाद्वारे देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

#हॅशटॅग्स:
#महावितरण #पावसाचा_इशारा #हायअलर्ट #वीजपुरवठा #लोकेशचंद्र #वादळवारं #कोकण_पाऊस #मराठवाडा_पाऊस

फोटो 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]