नऊ वर्षांनंतर आरसीबी आयपीएलच्या अंतिम फेरीत; पंजाब किंग्जचा ६० चेंडू शिल्लक राखून केला पराभव

नऊ वर्षांनंतर आरसीबी आयपीएलच्या अंतिम फेरीत; पंजाब किंग्जचा ६० चेंडू शिल्लक राखून केला पराभव

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गोलंदाजांच्या कामगिरीनंतर, फिल साॅल्टच्या अर्धशतकाच्या मदतीने, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने क्वालिफायर-१ सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला आणि आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पंजाब संघाला १४.१ षटकात फक्त १०१ धावांवर गुंडाळले. प्रत्युत्तरात आरसीबीने १० षटकात दोन गडी बाद १०६ धावा केल्या आणि सामना जिंकला.

आरसीबी संघ आता पहिले जेतेपद जिंकण्यापासून एक पाऊल दूर आहे. पराभव होऊनही पंजाब संघाला जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश करण्याची अजून एक संधी आहे. गट टप्प्यात अव्वल स्थानावर असल्याने, पंजाबला अतिरिक्त संधी मिळेल. पंजाबचा सामना रविवारी क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शुक्रवारी होणाऱ्या एलिमिनेटरच्या विजेत्याशी होईल. जर पंजाबने तो सामना जिंकला तर ते अंतिम फेरीत पोहोचू शकतील जिथे त्यांचा सामना ३ जून रोजी अहमदाबादमध्ये आरसीबीशी होईल. कमी लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने विराट कोहलीची विकेट लवकर गमावली, जो १२ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने १२ धावा काढून बाद झाला. त्यानंतर साॅल्ट आणि मयंक अगरवालने डाव पुढे नेला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. तथापि, मुशीर खानने मयंकला श्रेयस अय्यरच्या हाती झेल देऊन तंबूमध्ये पाठवले. १३ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १९ धावा काढून मयंक बाद झाला. साॅल्टने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल प्लेऑफमध्ये आरसीबीसाठी हे सर्वात कमी चेंडूंमध्ये केलेले अर्धशतक आहे. या बाबतीत सॉल्टने ख्रिस गेलला मागे टाकले, ज्याने २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. साॅल्ट येथेच थांबला नाही आणि तो संघ जिंकेपर्यंत खेळपट्टीवर राहिला. कर्णधार रजत पाटीदारने मुशीर खानच्या चेंडूवर षटकार मारून संघाला जेतेपदाच्या सामन्यात नेले. साॅल्टने २७ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ५६ धावा काढल्यानंतर नाबाद राहिला, तर पाटीदारने आठ चेंडूत एक चौकार आणि एक षटकारासह १५ धावा काढल्या.

यापूर्वी, पंजाबची फलंदाजी खूपच खराब होती आणि संघाने निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्याकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक २६ धावा केल्या. त्याच वेळी, प्रभसिमरन आणि अझमतुल्लाह उमरझाई प्रत्येकी १८ धावा करून बाद झाले. त्यांचे सहा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पंजाबची फलंदाजी इतकी खराब होती की संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. यासह पंजाबने एक नको असलेला विक्रम आपल्या नावावर केला. पंजाबचा संघ आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वात कमी षटके फलंदाजी करणारा संघ बनला आहे. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) ने बनवलेला हा नको असलेला विक्रम त्यांनी मागे टाकला. त्यावेळी, दिल्लीचा संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध फक्त १६.१ षटके फलंदाजी करू शकला. आयपीएल प्लेऑफमधील ही संयुक्त तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्माने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या तर यश दयालने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें