पावसाने घेतली विश्रांती; राज्यात उकाडा वाढला, विदर्भात येलो अलर्ट

 

पावसाने घेतली विश्रांती; राज्यात उकाडा वाढला, विदर्भात येलो अलर्ट

मुंबई: राज्यात यंदा लवकर दाखल झालेला मान्सून सध्या थोडा मंदावला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की, ही पावसाची विश्रांती म्हणजे पूर्ण ब्रेक नाही, तर काहीशी उघडीप आहे.

सध्या मुंबई, पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पावसाने थांबा घेतला असून हवामान विभागाने विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, ३१ मे ते ३ जून या कालावधीत मुंबईसह कोकण वगळता राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होईल. यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी आवश्यक असलेली उघडीप मिळण्याची शक्यता आहे.

खुळे म्हणाले, “३ जूनपासून कोकणातही उघडीप मिळू शकते. त्यामुळे पावसाच्या पुढील वाटचालीला अडथळा येणार नाही. मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र २ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.”

सध्या मान्सूनने अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिण भागात प्रवेश केला आहे. मात्र, पालघर, नाशिक, खान्देश, संभाजीनगर व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मान्सून पोहोचलेला नाही.


???? फोटो

 


????️ हॅशटॅग्स:

#पावसाचीउघडीप #मान्सून2025 #हवामानखात्याचा_इशारा #विदर्भातपाऊस #शेतकरीमित्र #RatnagiriVartahar

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें