शिवकालीन रणरागिनी” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा

शिवकालीन रणरागिनी” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक तेजस्विनी स्त्रियांनी समाज, कुटुंब, युद्धनीती, राज्यकारभार आणि संस्कृतीमध्ये अतुलनीय योगदान दिले. या स्त्रीशक्तीचा अभ्यास, जागर आणि अभिमान व्यक्त व्हावा, यासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)” आणि “मराठी साहित्य व कला सेवा” या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एक राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा विषय शिवकालीन रणरागिनी असा असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी, अभ्यासक, गृहिणी, लेखक आणि साहित्यप्रेमींना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शब्दमर्यादा १००० ते १५०० असून, स्पर्धा खुल्या गटात होणार आहे. विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये ५०००/–, द्वितीय क्रमांकासाठी ३०००/– आणि तृतीय क्रमांकासाठी २०००/– सन्मानचिन्ह आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्र मुंबई येथे १५ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमात देण्यात येईल. स्पर्धेची नियमावली आणि अधिक माहितीसाठी marathisahityavkalaseva@gmail.com किंवा WhatsApp क्रमांक ९९८७७४६७७६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें