‘मतचोरी’च्या आरोपांवरून राहुल गांधींना महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची नोटीस…

 

‘मतचोरी’च्या आरोपांवरून राहुल गांधींना महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाची नोटीस

 

राहुल गांधींना पुरावे सादर करण्याचे निर्देश, दोन्ही राज्यांमध्ये वाढल्या अडचणी

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’च्या आरोपांवरून निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न केला असता, आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कर्नाटक पाठोपाठ आता महाराष्ट्र निवडणूक आयोगानेही राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. दहा दिवसांच्या आत शपथपत्रासह आपल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याचे निर्देश या नोटीसमध्ये देण्यात आले आहेत.

नेमके प्रकरण काय?

७ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदार यादीतील गोंधळ आणि ‘मतचोरी’च्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले होते. विशेषतः महादेवपुर विधानसभा मतदारसंघात पात्र मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणि अपात्र मतदारांचा समावेश करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

या आरोपांनंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राहुल गांधींना पाठवलेल्या स्मरणपत्रात ‘Registration of Electors Rules, 1960’ च्या नियमांनुसार आपल्या आरोपांना पाठिंबा देणारे शपथपत्र आणि संबंधित मतदारांची नावे सादर करण्यास सांगितले आहे. असे केल्यास, ‘Representation of the People Act, 1950’ नुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

कर्नाटक निवडणूक आयोगाने याआधीच नोटीस पाठवल्याने, आता महाराष्ट्रातील आयोगाच्या या भूमिकेमुळे राहुल गांधी यांच्यावर दोन्ही राज्यांतील प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.


 

#RahulGandhi #ElectionCommission #MaharashtraNews #Congress #PoliticalNews

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें