राजापूर – भू – साटवली – लांजा मार्गावर परतीच्या एस.टी. गाड्यांची मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

💺 राजापूर – भू – साटवली – लांजा मार्गावर परतीच्या एस.टी. गाड्यांची मागणी

सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर आंबोळकर यांची लांजा डेपो प्रशासनाकडे मागणी

राजापूर : राजापूर आगारातून सकाळी ११.१५ वाजता ओणी मार्गे लांजा सोडली जाणारी एस.टी. गाडी भू – साटवली – लांजा परतीच्या मार्गावर सोडण्यात यावी, अशी मागणी मार्गसुचक सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर आंबोळकर यांनी लांजा डेपो प्रशासनाकडे केली आहे.

सध्या ओणी – लांजा मार्गे गाड्यांची संख्या अधिक असून, भू – साटवली या ग्रामीण भागातून दुपारी एकही गाडी लांजा परतीची नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सकाळी ७.१५, ११.१५, १२.४५ आणि दुपारी २.४५ वाजताच्या गाड्या लांजा परतीच्या मार्गावर सोडाव्यात, अशीही सूचना करण्यात आली आहे.

यामुळे भू – साटवली परिसरातील प्रवाशांना कमी वेळेत आणि कमी खर्चात थेट लांजाला जाणे शक्य होईल. विशेषत: महिला प्रवाशांना या परतीच्या गाड्यांचा मोठा दिलासा मिळेल, असे आंबोळकर यांनी स्पष्ट केले आहे. महामंडळालाही यामुळे फायदा होईल, असा त्यांचा विश्वास आहे.

— सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर आंबोळकर यांची लांजा डेपो प्रशासनाकडे मागणी

🔖 हॅशटॅग्स :
#राजापूर #लांजा #STबस #रत्नागिरी #साटवली #भू #STबसेवा #KonkanTransport

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]