राज्य परिवहन महामंडळत ४३४ पदांची भरती ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्य परिवहन महामंडळत ४३४ पदांची भरती

३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी, दि. ११ (जिमाका):- राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामध्ये शिकाऊ उमेदवार भरतीकरिता विविध कार्यशाळा व्यवसायातंर्गत ४३४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. www.https://apprenticeshipindia.org/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग कार्यालयात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे विभाग नियंत्रक राज्य परिवहन प्रज्ञेश बोरसे यांनी कळविले आहे.

सदर भरतीकरीता ऑनलाईन अर्ज व राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी या कार्यालयाकडे उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन नमुना अर्ज असे दोन्ही अर्ज विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा राहील. सदर भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, भरावयाच्या जागांमध्ये वाढ किंवा घट करणे इत्यादीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विभाग नियंत्रक, राज्य परिवहन रत्नागिरी विभाग यांना राहतील,

शिकाऊ उमेदवारी भरतीकरीता विविध कार्यशाळा व्यवसायांतर्गत रिक्त पदे पुढीलप्रमाणे आहेत. यांत्रिक डिझेल ११०, यांत्रिक मोटारगाडी ११०, वीजतंत्री ६०, पत्राकारागीर ४४, सांधाता २५, कातारी १०, यंत्र कारागीर १०, रेफिजरेशन अँड एयर कडीशनिंग ५, साठा जोडारी ४४, सुतार ४, रंगारी १०, शिवणकाम २.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]